वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल

  * संध्याकाळी लवकर सूर्यास्ताच्या आत किंवा निदान 7 PM पर्यंत जेवावे.

(त्यासाठी सकाळी 8 च्या आत हलका नाश्ता -पेज,मउभात,सूप इत्यादी किंवा  नाष्टा न करणे व दुपारचे जेवणच 10.30 ते11 पर्यंत घेणे आवश्यक)


* संध्याकाळी जेवणानंतर कोणतेही द्रवपदार्थ पाणी,कॉफी,चहा,कॉल्डड्रिंक juice,ice cream इत्यादी न घेणे .

लवकर जेवल्यामुळे भूक लागल्यास लाह्या,कुरमुरे,खाकरा,

राजगिरा लाडु असे कोरडे पण हलके  पदार्थ खावे.




*तहान नसताना,जेवणानंतर लगेच, सूर्यास्तानंतर,उगाच अनावश्यक पाणी पिऊ नये.जेवणाच्या आधी पाणी पिल्याने वजन कमी होते.


*पाणी नेहमी बसून,भांड्याला तोंड लावून,चहाप्रमाणे घोट घोट प्यावे.उभ्याने बाटलीने गटागटा पाणी पिऊ नये.


*उन्हाळ्यात साधे व हिवाळ्यात कोमट किंवा गरम पाणी तहानेनुसार प्यावे.ऋतूनुसार पाण्यात औषधी पदार्थ टाकावे .उदा - उन्हाळ्यात धणे ,जिरे घालून उकळलेले पाणी किंवा पावसाळ्यात सुंठ,नागरमोथा घालून उकळून गाळून घेतलेले पाणी


*पोट चेपले जाईल असे व्यायाम करावे. सूर्यनमस्कार,साष्टांग नमस्कार, लोटांगण, प्रदक्षिणा,योगासने(बसून, उभे राहून,पोटावर झोपुन व पाठीवर झोपून ) इत्यादी सर्व प्रकारची योगासने करावी.


*चालणे,धावणे,नृत्य,पोहोणे,टेनिस,बॅडमिंटन इत्यादी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी करावे.


कार,लिफ्ट,सोफा,शौचाच्या वेळी कमोड यांचा वापर कमीत कमी करावा. खाली बसणे, जिने चढणे,पायी चालणे,हाताने जास्त कामे करणे. उदा- कपडे धुणे,पिळणे,लादी पुसणे,बागकाम,कणिक मळणे,नारळ खरवडणे इत्यादी करावे.


*सतत एका जागी बसणे टाळावे, मध्ये उठून थोडे फिरावे, stretching करावे.


*आहारात गहू,बेकरी पदार्थ, पाव,बिस्कीट,केक,मैदा कमीत कमी वापरावा.

ज्वारी,बाजरी,नाचणी भाकरी किंवा फुलके खावे.


*तांदूळ 1वर्ष जुना,कमी पॉलिशचा,स्थानिक जातीचा वापरावा.

भात उघड्या पातेल्यात बनवलेला,पेज काढून टाकलेला खावा.अशा भाताने वजन,चरबी,शुगर वाढत नाही.

नवीन तांदूळ,कुकरचा भात,बासमती सारखे पचायला जड तांदूळ वापरले तर मात्र वजन वाढू शकते.


* जर्सी गायीचे दूध,चीज,बटर,दही,योगर्ट,

चॉकलेट इत्यादी बंद करावे.


देशी गाईचे (A2मिल्क) (सकाळी ) ,

देशी गाईचे तूप (जेवताना गरम भात किंवा भाकरीला लावून) ,

ताक (दुपारी जेवताना) घ्यावे.


* ताज्या भाज्या विशेषतः फळभाज्या (पालेभाज्या कमी) व season नुसार फळे नाश्त्यामध्ये व जेवणात खावी .फळांचे juice व अन्य पदार्थ नको.


*मधल्या खाण्यासाठी सर्व प्रकारच्या लाह्या,उकडलेले मूग,

काळ्या मनुका (black resins),

जर्दाळू (apricot),खारीक,

लाह्यांचा किंवा कुरमुऱ्याचा चिवडा, खाकरा,चिकी,ताजे घरी बनवलेले भाज्यांचे सूप घ्यावे.


*पुदिना,आले,लसूण, कांदा, मिरे,जिरे,दालचिनी,हळद या मसाल्यांचा भरपूर  वापर करावा.


* ब्रॉयलर प्रकारचे,फ्राईड,फ्रोझन नॉनव्हेज टाळावे.

नॉनव्हेज कमीच खावे शक्य असल्यास पूर्ण टाळावे .


*जेवणानंतर 10 मिनिटे सावकाश फेऱ्या माराव्या.


*आंघोळ करताना साबण वापरू नये. त्रिफळा चूर्ण,शिकेकाई चूर्ण, मसुर डाळीचे पीठ असे पदार्थ साबणा ऐवजी वापरावे.चरबी जास्त असणाऱ्या ठिकाणी थोडे घासून लावावे.यामुळे चरबी कमी होते.                                                                                                                                         

                                                                                                                                                                       पंचकर्मातील मसाज(त्रिफळा तेल) व उद्वर्तन उपचार वजन कमी होण्यास उपयुक्त आहेत.सोबतच स्वेदन (स्टिमबाथ ) व लेखन बस्ती अनावश्यक चरबी कमी करतात. 

                                                                                                                                                                              


                                                         

* आरोग्य तज्ज्ञ *

वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)

वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)


श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक

कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 

https://www.infertilityayurved.in/


हेल्पलाइन नं:

7796775000

9422558509

9822634478

Comments

Popular posts from this blog

मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी घ्यावयाची काळजी

Home Remedies for Arthritis ( Marathi )

थायरॉईड व त्यावरील आयुर्वेदिक उपाय